शिखर शिंगणापूर संपूर्ण माहिती | Shikhar Shingnapur Yatra 2025 – Viral Varta

 

शिखर शिंगणापूर हे देवस्थान कुठे आहे ? Where is Shikhar Shingnapur?

हे शंभू महादेवाचे देवस्थान, महाराष्ट्रातील सातारा शहरापासून ६५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दहिवडी या  माण तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर आहे. हे ऐतिहासिक देवस्थान सातारा, सोलापूर आणि पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे . या ठिकाणी शिंगणापूर हे  ऐतिहासिक गाव आणि शंभू महादेव मंदिर हे धार्मिक स्थळ आहे.

शिखर शिंगणापूर देवस्थानचे ऐतिहासिक महत्व काय आहे? Historical information about Shikhar Shingnapur.

 महाराष्ट्राचे मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कुटुंबाचे पूर्वजांचे कुलदैवत म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे . या मंदिराला शिवाजी महाराजांचे वैयक्तिक मंदिर म्हणून सुद्धा ओळखले जाते. हे भगवान शंभूचे शंकराचे एक जागृत देवस्थान आहे आहे. या मदनादिरला छत्रपतींच्या पूर्वजांनी तसेच शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या नाही राजांनी अनेकवेळा वारंवार भेटी दिल्या आहेत या मंदिराच्या देखभालीसाठी देणग्या दिल्या आहेत. 

शिखर शिंगणापूरला कसे जाल? How to go Shikhar Shingnapur?

 शिखर शिंगणापूर हे ठिकाण सातारा जिल्ह्यातील दहिवडी या गावापासून 20 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. हे ठिकाण फलटणच्या आग्नेयपूर्वेस सुमारे 37 किलोमीटर अंतरावर आहे. या भागातील डोंगर शंभू महादेवाचा डोंगर म्हणून ओळखला जातो. या डोंगराच्या त्याच्या पायथ्याला लागून शिंगणापूर गाव आहे. हा डोंगर सह्याद्रीचा एक भाग आहे. महादेवाचे मंदिर या डोंगरावर समुद्रसपाटीपासून 1,050 मीटर उंचीवर वसलेले आहे, या मंदिरामध्ये जाण्यासाठी सुमारे 400 पायऱ्या चढून जावे लागते तसेच गाडी डोंगरावर जाण्यासाठी वाटसुद्धा आहे. याच टेकडीवर खडकेश्वर मंदिर आहे. 

शिखर शिंगणापूरची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती? Important about Shikhar Shingnapur temple.

 शिखर शिंगणापूर मंदिराचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये मोठ्या घंटा आहेत, या घंटामधील एक ब्रिटिशांनी भेट म्हणून महादेव चरणी अर्पण केली आहे.

 

मंदिरामध्ये आहे अनोखे शिवलिंग  Shivling Information

 मंदिराच्या मध्यभागी दोन शिवलिंगे आहेत जी शिवपार्वतीचे प्रतिनिधित्व करतात असे मानले जाते.

मंदिराचे शिखर हे स्थापत्यकलेचे एक उल्लेखनीय उदाहरण आहे, या मंदिराच्या शिखरावर अतिशय लहान कोरीवकाम केलेले आहे. मंदिराचे मैदान असंख्य दीपमाळांनी सुशोभित केलेले आहे आणि पश्चिमेला अमृतेश्वराचे हेमाडपंती मंदिर आहे. 

शिखर शिंगणापूरची मंदिर कोणी बांधले? Who build Shikhar Shingnapur temple?

 महाराष्ट्रातील खूप साऱ्या लोकांचे कुलदैवत असलेल्या शंभू महादेवाची शिखर शिंगणापूर येथील मंदिरात पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार, महादेवाचे मंदिर आणि शिंगणापूर गाव हे दोन्ही यादव कुळातील चक्रवर्ती राजा असणारे सिंघणदेव महाराज यांनी बांधले होते. मंदिर दगडी भिंतीची तटबंधी आहे आणि या मंदिराच्या समोर पाच मोठमोठे नंदी आहेत. देवगिरीच्या यादव घराण्यातील राजा सिंघन याने याच गावात जाऊन वास्तव्य केल्याचे सांगितले जाते, आणि त्यानेच शिंगणापूरची स्थापना केली. 

मालोजीराजेंनी शिखर शिंगणापूर मंदिरासाठी बांधले पुष्करतीर्थ/शिवतीर्थ – Father of Chatrapati Shivaji Maharaj had visited hear?

 शंभू महादेव हे भोसले घराण्याचे कुलदैवत असल्याने मालोजीराजे भोसले त्यांचे कुटुंबीय याठिकाणी नेहमीच दर्शनासाठी येत असत. पाण्याच्या कमतरतेमुळे या ठिकाणी नेहमीच दुष्काळी परिस्थितीती असायची. मालोजी राजांनी ..१६०० मध्ये भेट दिली असताना भाविकांचे होणारे हाल त्यांनी पहिले आणि पुष्करतीर्थ नावाचे तलाव बांधले, या तलावाचे नाव बदलून आता शिवतीर्थ केले आहे. 

शाहू महाराजांनी शिखर शिंगणापूर मंदिराचा केला जीर्णोद्धार – Chatrapati Shahu Maharaj had built Shikhar Shingnapur temple?

  सिंघण राजाने बांधलेले मंदिर कोसल्यानंतर , शाहू महाराजांनी 1735 सध्याचे मंदिर बांधले या ठिकाणचा जीर्णोद्धार केला. या काळामध्ये बाजी गोळे यांनी बांधकामाची देखरेख केली होती. यानंतर अजून एकदा 1978 मध्ये वास्तुविशारद रामास्वामी यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. त्यांनीच या मंदिराला त्याला नवा रंगही दिला.

शिखर शिंगणापूरची यात्रा कधी असतेShikhar Shingnapur Yatra information

 शिखर शिंगणापूरची यात्रा चैत्र गुढी पाडव्यापासून ते चैत्र पौर्णिमा, चैत्र शु. अष्टमी हा शंकर आणि पार्वतीच्या विवाहाचा महत्त्वपूर्ण उत्सव आहे. याआधी चैत्र शुद्ध प्रतिपदेला लग्नसमारंभात हळद लावली जाते. खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवभक्त चैत्र शुद्ध पंचमीला शंभू महादेव आणि पार्वतीमातेला हळद लावण्यासाठी येतात. विवाह सोहळ्यात श्री अमृतेश्वर मंदिराच्या शिखरावर पागोटे बांधले जातात, शंभू महादेवाच्या लग्नाच्या अंगठीचे प्रतीक असलेले 550 फूट लांब पागोटे. हे काम सोपवलेले कुटुंब वर्षभर मेहनत करून मध्यरात्रीहर हर हर महादेवच्या जयघोषात विवाहसोहळा पार पाडतो. पूर्वी इंदूरचे राजा होळकर चैत्र शुद्ध एकादशीला महादेवाचे दर्शन घेत असत.

शिखर शिंगणापूर यात्रेला आहे कावडीची परंपरा – History of Shikhar Shingnapur yatra date.

 शम्भू महादेवाला अभिषेक करण्यासाठी भक्त कावडीत पवित्र नद्यांचे पाणी घेऊन येतात . हे भक्त महाराष्ट्रातील तसेच कर्नाटकातून सुद्धा आलेले असतातया कवड्यांपैकी सर्वात मोठी कवाड घेऊन येतात ते भुतोजी तेली महाराजांचे अनुयायी. या कवडीला दोन मोठ्या राजणांमध्ये भरून पाणी आणले जाते . ते उचलणे अत्यंत कठीण घेऊन मुंगी घाटाच्या मार्गाने वर घेऊन येणे तसे अशक्यच असते पण ज्या शंभू महादेवाला अभिषेक करायचा त्याचेच नाव घेऊन बोलावले जाते महादेवाच्या कृपेने द्राविडी प्राणायाम कारण हे पवित्र जल महादेवाच्या अभिषेकासाठी पोचते. या कवडीला श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याइतका जुना इतिहास आहे आणि हि कवाड सासवड येथील तेल्या भुतोजी महाराज तेली यांची कावडी परंपरा आजही सुरू आहे.

हा एक मोठा आव्हानात्मक उपक्रम शिखर शिंगणापूर यात्रेमध्ये पाहायला मिळतो, ज्यासाठी भाविक दोरीचा वापर करता अवघड मुंगी घाट चढून, आधारासाठी मानवी साखळी तयार करतात. शिवाचे नामस्मरण करत दिवसभर उन्हाचा तडाखा सहन करतात. हे कावडी भक्त  महादेवाला आव्हान करतात  कारण भक्त मदतीसाठी हाक मारतात आणि निर्धाराने घाट चढतात. यात्रेची सांगता मोठ्या महादेवाला अभिषेक करून शिंगणापूर येथील शिखर सोहळ्याने होते.

 शिखर शिंगणापूर ची यात्रा अतिशय मोठा उत्सव असतो जे पाहण्यासाठी लाखो भाविक याठिकाणी येतात. 

शिखर शिंगणापूर कोणत्या तालुक्यामध्ये आहे ? In which taluka Shikhar Shingnapur is?

 शिखर शिंगणापूर मंदिर हे माण तालुक्यात आहे . या तालुक्याचे ठिकाण दहिवडी आहे आहे . हा तालुका दुष्काळी समाजाला जातो. या तालुक्यामध्ये पाणी आणणे हि काही मोठी गोष्ट नाही. नदीजोड प्रकाल्प करून हे पाणी अगदी सहजपणे उपलब्ध केले जाऊ शकते पण या बाबतीमध्ये जनतेची मोठी फसवणूक झाली आहे . शेतीसाठी विकतचे पाणी आणणे हा नेहमीच तोट्याचा सौदा असतो म्हणून या ना त्या कारणाने येथील पुढारी मंडळींनी हे पाणी आणण्यासाठी नेहमीच चालढकल केली आहे . दहिवडी हे तालुक्याचे ठिकाण असले तरी या ठिकाणी काहीच प्रगती झाली नाही . म्हसवड वडुजसारख्या चांगल्या बाजारपेठा जवळच आहेत . 

माण तालुक्याच्या राजकारणामध्ये महत्वाचे कोण ? Political issues in Man Taluka (Dahiwadi).

माण  तालुक्याचे राजकारण हे अगॉथेर राष्ट्रवादी आणि सध्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या हातामध्ये आहे . या तालुक्यामध्ये स्व. सदाशिवराव पोळ यांनी ४० वर्षे राष्ट्रवादीची सत्ता ठेवली तर आमदार जयकुमार गोरे हे गेली १५ वर्षे सत्ता अपभोगात आहेत . जनतेच्या पाण्याचा प्रश्न गेली ७० वर्षे आहे आणि तो अजूनही कोणी सोडवला नाही . गाढवाच्या समोर गाजर बांधून ज्या पद्धतीने काम करून घेतले जाते त्या प्रकारे पाण्याचे गाजर दाखवून प्रत्येक वेळी जनतेकडून मते घेतली जातात पण प्रश्न तसेच राहतात.

 

Thanks for reading our best viral blog named viral varta. Keep searching for more information on our website viralvarta.com 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top